पहिल्याच दिवशी सत्यजीत तांबे विधान परिषेदत ‘या’ मुद्द्यांवर भूमिका
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आज माझा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही मला मोठमोठे प्रश्न विचारत आहात. जी माझी भूमिका असेल ती निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करेन. आज राज्यात अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जुन्या पेन्शन योजनेवरून फार मोठा उद्रेक झाला आहे. औद्योगिक विकास जो राज्यात सुरू आहेत, त्याचा समतोल कसा साधला जाईल. सगळ्या विभागात कशा पद्धतीने औद्योगिक विकास होईल आणि त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल? असे सगळे प्रश्न मला विधान परिषदेत मांडायचे आहेत,” असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
