संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे – आत्माराम देशमुख
अहिल्यानगर – लोकवेध live न्यूज
अहिल्या नगरचे विभाजन करून संगमनेर हा नवीन जिल्हा करा सर्वांना सोयीस्कर अशा संगमनेर तालुका आहे जिल्ह्याच्या दृष्टीने या ठिकाणी भव्य इमारती भौगोलिक परिस्थिती या तालुक्याची स्थिती आहे त्यामुळे सर्व विचार करून संगमनेरला डोंगरी जिल्हा म्हणून घोषित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता आत्माराम देशमुख यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना ही निवेदन दिले आहे
या निवेदनात म्हटले आहे की
माजी उप मुख्यमंत्री बॅ. रामरावजी आदिक साो. यांना मोठा गर्व व अहंकार श्रीरामपुर जिल्हा करणेसाठी त्यांनी ८२-८३ साली संगमनेर प्रांत कचेरीची पुर्नरचना करुन स्वतंत्र प्रांत कार्यालय श्रीरामपुर स्थापन केले. तशा प्रकारचा गर्व अहंकार भुतपुर्व महसुल मंत्री आणि राज्याचे विद्यामान जल संपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना गर्व अहंकार झाला आहे. तरी नामदार राम शिंदे साहेब आणि आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांनी रास्त व न्यायीकबाजुन उभे राहुन अहिल्यानगर बरोबरीचे संगमनेर जिल्हा करुन दयावा आपण मध्यस्थी करावी हि नम्र विनंती.
साधा कामगार हुतात्मा बाबु गेणु ट्रकचे चाक बंद केले तशाच प्रकारे आम्ही संगमनेरकर आणि अकोलेकर नाम राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाण्याचे चाक बंद करू. आम्हांला हौस नाहीं परंतु त्यांनी मोठा गर्व अहंकार करुन त्यानी शिर्डी जिल्हा करणेसाठी ६ तालुक्यासाठीचे कारभार शिर्डीला नेवुन अप्पर जिल्हाधिकार्यालय स्थापन केले त्याचा हेतु आमच्या ध्यानात आहे. आम्ही पार्सलिटी करु देणारच नाही. आम्ही ओझर पाशी त्यांचे पाण्याचे चाक बंद करुन तरी सरकारने हस्तक्षेप करुन अहिल्यानगर बरोबरीचे तात्काळ संगमनेर डोंगरी जिल्हा घोषित करुन संगमनेर येथे जिल्हाधिकार्यालय व अप्पर जिल्हाधिकार्यालय स्थापन करण्यात यावे. हि नम्र विनंती.