पीक कर्जाची  नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु अनुदान तातडीने मिळावे – भास्कर पानसरे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 


शिंदे – फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी  नियमीत कर्जाची  परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०रु सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही अनेक शेतकरी यापासून वंचीत आहेत.  याबाबत सरकारने शेतकऱ्यांना वेठीस न धरता व त्यांच्याशी शाब्दीक खेळ न करता तातडीने उर्वरीत अनुदान द्यावे अशी मागणी घुलेवाडी गावचे माजी सरपंच व काँग्रेसचे कार्यकर्ते भास्कर पानसरे यांनी केली आहे

याबाबत बोलतांना भास्करराव पानसरे  म्हणाले कि, गेल्या मार्च महिन्यात अधिवेशन काळात माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी मुख्यमंत्री नियमीत पीक कर्जाची  परतफेड करणाऱ्या  ५० हजारांचे अनुदान कधी देणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता.  त्यावर ३१ मार्च २०२३ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले  होते.

मात्र आता मे महिना सुरु असून अद्यापही अनेक शेतकरी या लाभापासून वंचीत आहेत .
सरकारने सानुग्रह अनुदान देण्याबाबत कोणत्याही जाचक अटी व शर्थी व घालता शेतकऱ्यांना वेठीस धरु नयेत  शेतकरी अवकाळी पाऊस,महागाई,शेतमालाल भाव नाही अशा अनेक संकटांचा मुकाबला करीत असून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे .
सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने अंमलबजावणी करताना उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पानसरे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!