टंचाईग्रस्त व पिक विम्यासंदर्भात मा. खा. श्री. सदाशिव लोखंडे साहेबांच्या उपस्थितीत बैठक
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
टंचाईग्रस्त व पिक विम्यासंदर्भात मा. खा. श्री. सदाशिव लोखंडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित केलेली होती
त्यावेळी खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी सांगितले की शासनाच्या 25% रक्कम अदा करणार आहे अदा करण्याचे काम युती शासनाने केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे लाभक्षेत्रातील 90 हजार शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपला टंचाई भाग आहे त्यामुळे निळवंडे लाभ क्षेत्रातील 84 गावांना पिण्याचे पाणी असेल शेतीसाठी पाणी असेल त्यांना दिलासा देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कडे मागणी केली ती सदर पाटबंधारे खात्याकडे गेलेली आहे आता आपण टंचाईच्या रूपाने सदर 84 गावांना आणि वरच्या भागाला पाणी सोडण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे तो दिलासा अधिक हे पिण्याचे पाणी मिळेल अशी भूमिका घेतलेली आहे टंचाईग्रस्थ व पीक विम्या संदर्भात जास्तीत जास्त मोबदला मिळवून देईल असे सांगण्यात आले.त्यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख कावेरी नवले,तालुका प्रमुख रमेश काळे, राजू सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रणजित ढेरंगे, मागासवर्गीय सेल सोमनाथ भालेराव,शिवसेना उप तालुका प्रमुख बाळासाहेब राऊत, वाडीलाल कर्पे,वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले,महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली तारे,अल्पसंख्यांक शहर प्रमुख कमरली मन्सूरी, वैद्यकीय सेल तालुका प्रमुख महेश उदमले,वैद्यकीय सेल शहर प्रमुख विठ्ठल ढगे मामा, वाहतूक सेना शहर प्रमुख बाळासाहेब व्यवहारे,वाहतूक सेना उपतालुका प्रमुख विकास पवार आणि इतर शिवसैनिक आणि शेतकरी उपस्तित होते.
