महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित असलेले विकास कामे मार्गी लावणार – आमदार अमोल खताळ

घुलेवाडीत सव्वादोन कोटीच्या विकास कामांचा आ खताळ यांच्या हस्ते शुभारंभ

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 


संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिलयांच्या माध्यमातून भरीव निधी आणू शकलो. या निधीतून विविध विकासकामे मार्गीलागत आहे त्यात घुलेवाडीत सव्वा दोन कोटीची विकास कामे सुरू होत आहे.ती सर्वकामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याची अधिकार्यांनी काळजी घ्यावी.ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगला ठेवला तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामेकरू शकतील. अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्या मध्ये कामे शोधण्याची सोय करून घ्या अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिला.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतर्गत सव्वादोन कोटी रुपयांच्या विविधविकास कामांचे भूमिपूजन आ अमोल खताळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिव सेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार अल्प संख्यांक सेनेचे तालुकाध्यक्ष मंजाबापू साळवे रवींद्र गिरी शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे , विनायक वाडेकर भाजप उपाध्यक्ष भिकाजी राऊत सिताराम पानसरे विलास राऊत रोहिदास गुंजाळ बापूसाहेब देशमुख भैय्या सातपुते कैलास काशीद,स्वरूप राऊत, संजय पानसरे रोशन कोथिंबीरे स्वप्निल राऊत,सुनील राऊत, सुरज राऊत, प्रशांत राऊत,सुनील पानसरे ,ओंकार राऊत,वैभव राऊत ,रवी दिवे ,विजय घुले ,ओंकार काळे ,आकाश पवार ,सागर पवार यांच्यासह पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता नाना अहिरे आणि घुलेवाडी ग्रामपंचायत अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
आ. खताळ म्हणाले की घुलेवाडी ही जहागीरदारी आहे असे काही जण समजत होते.त्यांनी कधीच वंचित समाज बांधवांच्या भागाचा विकास केला नाही. निवडणुका आल्या की मगच त्यांना विकास दिसतो इतरवेळी ते या समाज बांधवांचा फक्त निवडणुकी पुरता वापर करत असतात. दादागिरीला भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असाविश्वास व्यक्त करते म्हणाले की या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्यांचा बंदोबस्त केला आहे. जर घुलेवाडीतील काही बगलबच्चे तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करू या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता विकास कामांच्या माध्यमा तून घुलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील.

 


केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आत्तापर्यंत सर्वांना लाभ मिळवून दिला आहे.मात्र जे काही या शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहे. त्यांना ही महायुती सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाईल राजकारण हे विकास कामा साठी केले पाहिजे.


घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात महायुती सरकारच्या माध्यमातून सोनो ग्राफी आणि डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इथून मागील काळात आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. मात्र आपल्या नातेवाई कांचे दवाखाने चालले पाहिजे म्हणूनच त्यांनी या तालुक्यातील ना आरोग्याचा आणि ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडू शकले हे त्यांचे अपयश असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!