प्रशासनाने शासन आपल्या दारी साठी विद्यार्थ्यांचे केले हाल

एन एस यु आय कडून तीव्र निषेध

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

अहमदनगर जिल्ह्यात सरकारच्या वतीने शिर्डी काकडी विमानतळ येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती व्हावी म्हणून प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय करत संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस पाठवले असून या घटनेच्या संगमनेर एन एस यु आय ने तीव्र निषेध केला असून ही करोडो रुपयांची उधळपट्टी असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी केली आहे.

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ जन्य परिस्थिती असल्याने शेतकरी व सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. राजकारणात सत्तेसाठी होत असलेल्या तडजोडीवर सामान्य माणसाची तीव्र नाराजी असून हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात होत असल्याने या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती राहणार नाही. याची जाणीव सत्ताधारी व प्रशासनाला होती.

जास्त गर्दी दिसावी याकरता  प्रशासनाने  काकडी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नागरिकांची उपस्थिती राहावी याकरिता  गावोगावी शासकीय कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांना हजर ठेवण्याची सक्ती केली.

या नागरिकांना आणण्यासाठी सर्व बस स्थानकांमधून बसेस या या कार्यक्रमासाठी वापरल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली .याची पर्वा मात्र शासनाने किंवा प्रशासनाने केली नाही.

संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस या या कार्यक्रमासाठी देण्यात आल्या आणि बस स्थानक प्रशासनाने याबाबत फलक प्रकाशित केला की आम्ही गाड्या या कार्यक्रमाला पाठवत आहोत .याबाबत ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी होती बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडाल्या.

या बेजबाबदारपणाचा एन एस यु आय चे अध्यक्ष गौरव डोंगरे, निखिल पापडेजा, शेखर सोसे,हैदर आली, वैष्णव मुर्तडक, यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला असून प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी करोडो रुपयांची उधळपट्टी होत असून या पैशांची कर्मचाऱ्यांकडून वसुली शासन करीत असल्याची खरमरीत टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!