“ध्येय विकासाचे… प्रत्येक पाऊल जनतेसाठीच टाकायचे!” — घुलेवाडी गणात किशोर आव्हाड यांच्याभोवती तरुणाईचा उत्साह

संगमनेर (प्रतिनिधी) :

पंचायत समिती निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गणात सध्या रंगतदार चर्चा सुरू आहे. “ध्येय विकासाचे गाठायचे, प्रत्येक पाऊल जनतेसाठीच टाकायचे” या घोषवाक्यासह तरुण नेते किशोर एकनाथ आव्हाड (M.Com) यांनी आपली उमेदवारी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी केला असून, त्यांच्या या निर्णयाचे स्वागत गणातील तरुणाई आणि ज्येष्ठ मतदारांनी उत्साहात केले आहे.

पत्रकार म्हणून “दैनिक युवावार्ता” या वृत्तपत्राशी कार्यरत असलेले किशोर आव्हाड हे समाजकारणाशी निगडित मुद्द्यांवर लेखन आणि प्रत्यक्ष कृती अशा दोन्ही माध्यमातून सक्रिय राहिले आहेत. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे, जनतेत मिसळणाऱ्या स्वभावामुळे आणि तरुण नेतृत्वाच्या आत्मविश्वासामुळे ते आज घुलेवाडी गणातील चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून गावातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. तरुणांच्या रोजगारासाठी लघुउद्योग मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत आणि सामाजिक उपक्रम हे त्यांच्या कार्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. “सत्तेसाठी नव्हे, समाजासाठी” ही त्यांची भूमिका जनतेला भावणारी ठरत आहे.

गणातील तरुण मतदारांनी एकमुखाने मत व्यक्त केले — “किशोर आव्हाड हे आमचेच प्रतिनिधी आहेत. त्यांनीच आमच्या प्रश्नांवर तोडगा काढू शकतो. त्यांच्यात कामाची तळमळ, बोलण्यापेक्षा कृती करण्याची ताकद आहे.” तर ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांचा उमदेपणा आणि तळागाळाशी असलेला संपर्क पाहून त्यांना पाठिंबा दिला आहे.

सध्या घुलेवाडी गणात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वातावरण तापले असले तरी किशोर आव्हाड यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीत नवा उमेदीचा झंकार निर्माण झाला आहे. त्यांच्या सभोवती युवकांचा उत्साह, महिलांचा विश्वास आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद दिसतोय.

किशोर आव्हाड म्हणतात, “मी राजकारणात येतोय ते केवळ जनतेच्या विकासासाठी. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकणार आहे. माझं ध्येय आहे — गाव, गण आणि संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास.”

आगामी दिवसांत त्यांचा प्रचार अधिक जोर पकडण्याची शक्यता असून, घुलेवाडी गणातील ही निवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.
जनतेच्या मनावर उमटलेलं नाव — किशोर एकनाथ आव्हाड!
ध्येय एकच — विकासाचा मार्ग, जनतेच्या विश्वासाचा संवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!