तमाशा कलावंत कांताबाई सातारकर स्मृति पुरस्काराने कोंडीराम आवळे सन्मानित

संगमनेर / अण्णासाहेब काळे

राज्यातील कर्तबगार आमदार म्हणून आ.अमोल खताळ यांची ओळख आहे.काम मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा कोणी धरू शकणार नाही. तालुक्यात औद्यगिक वसाहतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासठी आपण पुढील आठवड्यातच बैठक घेणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली.

आ.अमोल खताळ यांच्या पुढाकाराने जेष्ठ तमाशा कलावंत स्व.कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या पहील्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावर्षीचा पहिला पुरस्कार सातारा जिल्ह्याच्या वाई येथील तमाशा कलावंत कोडीराम आवडे मास्तर यांना मानपत्र स्मृतीचिन्ह २१हजाराचे मानधन देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ गणेश चंदनशिवे शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप प्रा.एस झेड देशमुख बापुसाहेब गुळवे नाट्यकलावंत डॉ सोमनाथ मुटकुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते बाबूशेठ टायरवाले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे राजेंद्र सोनवणे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे सौरभ देशमुख भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे गोकुळ दिघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साहीत्य कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले की निवडवून आल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी कलावंताची दखल घेवून एका कलावंताचा गौरव करण्याचा कार्यक्रम घेऊन आमच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हा सन्मान एकट्या आवळे मास्तर यांचा नसून राज्यातील सर्व लोक कलावंताचा आहे.यापुर्वी असे काम तालु क्यामध्ये झाले नाही.पण तुम्ही अमोल खताळ यांच्या रुपाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधीने कलावंताचा केलेला सन्मान सोहळा पाहीला तर तुम्हा सर्व मतदारांचे सुध्दा कौतुक असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.सरकार मधील मंत्र्याकडून काम दादागिरीने मंजूर कसे करून घ्यायचे हे अमोल खताळ यांच्या कडून शिकण्यासारखे आहे.अंगावर जळू जसा चिकटून राहातो.तसा राजकीय जळू अमोल खताळ यांच्याकडे आहे त्यांनी पुरस्काराच्या कार्यक्रमाला मला बोलावून औद्यगिक वसाहतीची केलेली मागणी मला नाकारणे शक्य नाही. औद्यगिक वसाहतीच्या संदर्भात पुढील आठवड्यातच बैठक घेण्याचे आश्वासित करून मंत्री सावंत म्हणाले की,या तालु क्यातील युवकांच्या रोजगारासाठी अमोल खताळ यांची धडपड पूर्णत्वास नेवून तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की संगमनेर तालुका कलावंताची खाण आहे.यापुर्वी कोणत्याचकलाकराचा असा सन्मान झाला नाही.परंतू अमोल खताळ यांच्या माध्यमातून झालेला हा सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचे सांगून लोककलेची जोपसाना करणार्या या कलाकवंतांनी स्वताचे दुख बाजूला ठेवून समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.आवळे मास्तर यांनी त्या भावनेतून रंगभूमीची सेवा केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.यापुढे तालुक्यात काॅ.दतादेशमुख भास्कराराव दुर्वे शाहीर विठ्ठल उमप पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे सोहळे मोठ्या उपक्रमाने आयोजित करणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

बाकीचे उद्योग तालुक्यात आता बंद झाल्याचा टोला लगावून मंत्री विखे पाटील यांनी आ.अमोल खताळ यांनी औद्यगिक वसाहतीसाठी केलेल्या मागणीला पाठींबा देवून तालुक्यात लवकर औद्यगिक वसाहत येण्याच्या दृष्टीने दृष्टीने आपणही पाठपुरावा करू. जिल्ह्याला असलेला साहीत्य कला आणि सांस्कृतिक वारसा पाहाता आम्हाला मराठी भाषा व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी आम्ही जागा उपलब्ध करून देवू तुम्ही निधी द्यावा आशी मागणी केली.
आमदार.अमोल खताळ यांनी या पुरस्काराच्या निमिताने तालुक्यात नव साहीत्य सांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा प्रयत्न असून दरवर्षी तालुक्यातील एका लोक कलावंताच्या नावाने आम्ही पुरस्कार देण्याचे नियोजन केले आहे.तालुक्यात रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टीने यापुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्यगिक वसाहतीची केलेल्या घोषणेला मंत्री उदय सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली.

पुरस्कार्थी कोडीराम आवळे मास्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या ऐंशी वर्षाच्या वाटचालीतील हा पहीला पुरस्कार असून ज्या भूमीत कलावंताची घडलो तिथै झालेला सन्मान मोठा आहे.आ.खताळ यांनी यासाठी घेतलेल्या कष्टाने उर भरून आला असल्याची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन सौ.स्मिता गुणे यांनी केले.प्रारंभी तमाशा कलावतांनी गण सादर केले .छायाचित्रकार आण्णासाहेब काळे यांनी तमाशा कलेतील विविध स्मृतिच्या छायाचित्र सर्वाचे लक्ष वेधून घेणारे ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले तर आभार शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी मानले या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी पुरस्कार निवड समितीचे गणेश बो-हाडे सुशांत पावसे राहुल सोमवंशी नीलिमा घाडगे प्रशांत कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!